माझा गाव मरमपल्ली
माझा गाव लोक बिरादरी प्रकल्प वरुन ३० कि.मी वर आहे.
माझ्या गावात एकुन १९० घरं आहेत. व मी लोक बिरादरी
प्राथमिक माध्यमिक आश्रम शाळेत शिकतो. आणि तिथ
१ ली ते १२ वी पर्यंत आहे.मी माझा गावाला फक्त दोन
ते तीन महिने राहतो.बाकी महिने शाळेत राहतो.
माझ्या बाबा घरी शेती करतो. व आम्हाला पैसे पुरवतो.
आम्ही तीन भाऊ असल्यामुळे एकटाला दिला की एकटाला
राग येतो.म्हणुन सारका देतो.  माझ्या गावात गोंड हा भाषा बोलला
 जातो.आम्हचा समाज गोंड आहे.माझ्या गावात कोणत्याही सण असल्यास
सर्व गावकरी एकात्रीत जमतात.व आप आपल्या बोलतात.गावातला पाठील हा तिथलं मुक्या असतो. तो सांगितल्या प्रमाणे ऐकतात. आणि लोटात
पाणी गेऊन गावतला गोटुलमध्ये येऊन बसतात. सकाळी ६.००
ते ७.०० वाजता आप आपल्या घरी जातात. आणि लोटातला पाणी
सर्वांना देतात. घरातला मोठा माणुस स्वतः बालटीत पाणी आणुन
आंघोळ करतात,व जेवायला बसतात. जेवन झाला की स्वतःचा कामी
लागतात.कुणी शेतात झातो,कुणी नदीत मासे पकडायला जातात.
सायंकाळी ४.३० दरम्यान घरी परत येतात.व हात-पाय धुऊन जेवन
करुन आपल्या विश्रांती घेतात.
अजय मडावी (वर्ग ९ वा)


आदिवासी समाज
                आदिवासी समाज म्हटलं की आपल्याला आठवतं,जंगलात राहणारी दुर्गम भागातील लोक. त्यांचा राहणीमान ,पोशाख व अन्न एकदम शहरी लोकांपेक्षा थोडं वेगळं असतं, पण आता थोडफार विकास झालेलं दिसतं. आदिवासी लोक जास्त प्रमाणात धानाची शेती करतात, पण तेही एकच वेळी जुलै ते ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर पर्यंत.इतर पिक म्हणून मका ,मिरची, मुंग व इतर भाजीपाला फक्त खान्या पुरता लावतात,पण काहीकाही विकतात सुद्धा.
                                                                               आदिवासी समाजात काही फळ असो वा धान खाण्यापूर्वी सर्वप्रथम पंडूम करतात आणि खातात.पंडूमच्या वेळी मग कोंबळे,बकरे या वस्तू देवाला अर्पन करतात. गावातले सर्व लहान मुलं ते म्हाताऱ्यापर्यंत सर्व पुरूष एकत्र येतात व साजरा करतात. त्यात नोवा पंडूम असोवा जाटा पंडूम. एखादी दिवस सर्व गावकरी एकत्र येतात व शिकारीला जातात.त्यात मिळालेल्या एखादी जंगली प्राण्याचा पर्टी म्हणून सर्व गावकरी आनंदाने खातात व राहतात.
                           इतर सणांच्या वेळी ते वेगनेगळे पदार्थ बनवतात व थोडं थोडं एक दुसऱ्या कुठूंबाला देतात.रात्रीच्या वेळी सर्व गावकरी एकत्र येतात व नाचतात. स्त्रिवर्ग रेला नृत्य करतात तर पुरूषवर्ग ढोलीवर नृत्य करतात. असा संपुर्ण रात्रभर चालतं मग सकाळी आपापल्या कामाले निघुन जातात.कुणी शेतावर जात तर कुणी जंगलात जातात. संध्याकाळी परत गोटूलात(समाज मंदिर) गप्पा मारण्यासाठी जमा होतात.                                                                                                                रोशन.पी.पुंगाटी
                                                    वर्ग९वी  
रोशन.पी.पुंगाटी
    वर्ग९वी