माझा गाव


आमच्या गावाचा नाव इरपनार . भामरागड तालुका मध्ये आहे.आमच्या गावात आजू बाजूनी हिरवा आणि गनदाट जंगल व्यापलेला आहे.आमच्या गावात ७० घरे आहे. आमच्या गावातील वातावरण खुप छान आहे . सकाळी पाहाटे उठतो तेव्हा चिमण्या पाखरंचे किलबिल सुरु असते. लहान पाखरे घरट्यात रहातात. आणि त्यांची माय चारा शोधून आणतात. असा प्रकारे सकाळाची दैनंदिन असते. आमच्या गावच्या आजू बाजूनी नदीचा उगम होतो. ते नदी रात्र आणि दिवस कळ-कळ असा आवाज करते. आणि शेतामधून वाहते. गावातील गाई गुरे तीथे पाणी पिऊण आपले तहान बागवतात. आमच्या गावात सर्व लोक शेतीवाळी करतात .वआपल्य पोट भरतात.आणि बाकीचे दान विकतात. पण कमी पैसा मध्ये विकतात. आणि त्या पैसातून  आपल्य घर चालवतात. आणि आपल्य देशा मध्ये असे पण लोक आहेत की ते स्वःतला मोठे पण समजतात. आणि शेतकरी लोकाना कमी पणा समजतात.पण एक वेळ असा येईल की तेव्हा शेतकरी लोक एक महिनासाठी शेतीकरनार नाही. तेव्हा बाकीचे लोकाना भात कुटून बेटनार.जरी ते नौकरी करत असल्या तरी पण भात बेटू शकत नाही. कारण शेतकरी शेती करुन दान विकलेच नाही. तर कुटून बेटनार. जरी आपन नौकरी मध्ये असल्य तरी काही परक पडत नाही.कारण नौकरी केल्यने पैसे भेटतात. पण शेती केल्याने आपला पोट भरतो. जर आपला देशात शेती करणारे शेतकरी कमी झाले.तर आपण जिवंत राहू शकत नाही. त्या साठी जास्ती जास्त लोक शेतीच्या उपयोग केला पाहिजे. नौकरी करणारे लोकानी कधी पण शेतकरी लोकाना कमी पणा समजायच नाही. उलट त्यांचा आभारी म्हणून घ्याची.कारण ते आहेत. म्हणून आम्ही सर्व लोक आहोत. आमचा गावात छोट्यासा गोटूल आहे. त्या गोटूल मध्ये मोठ्या लोकाचा चर्चा सूरु असते. पण मला असा वाटते की हे पध्दत  कायमतरने बदलनार आहे. कारण पिढीन पिढी मेल नंतर सर्व विज्ञ्यानीक यूग राहानार आहे. आणि लोक संख्या वाढणा आहे.आणि घर ,नौकरी,रोजगार,व्यावसाय, शिक्षण, शाळा, हॉटेल,दूकान,असा एक एक समस्या वाढत जातील. आणि आता कायनतराने विकत घ्यावा लागनार असा मला वाटते. कारण आताच ऐवळा प्रदूषन वाळत चालला आहे गावात प्रदूषन नाही  शहरात मध्ये होतो.आणि कायमतराने गावात पण होईल. असा मला वाटते.

नावः कुमारी उज्जवला सडमेक   
वर्गः १० वी


No comments:

Post a Comment