कोंबडा बाजार

भामरागडला आठवड्यातून बुधवारला एक दिवस भाजीपाल्यांची,कपड्यांची व इतर वस्तूंची बाजार भरते. त्याचप्रमाणे “कोंबडा बाजार” आठवड्यातून पाच-सहा दिवस बसत असते आणि वेगवेगळ्या दिवसी दुसऱ्या-दुसऱ्या गावांमध्ये बसत असते. त्यामध्ये अनेक आसपास गावचे माणसे स्वतःची कोंबडे घेऊन तैल्यात भरुन ज्या गावी कोंबडा बाजर भरते त्या गावी येतात. त्यात आल्यानंतर कोंबडाला तैलातून काडून मोकळा सोडतात व लहान रोपाला बांदून ठेवतात. काही माणसं आल्यावर थोड्या वेळात  प्रत्येकाने कोंबड्या धरून दुसऱ्याची कोंबडा विरूद्ध लढवण्यासाठी दुसऱ्याची कोंबड्याशी जोडी करतात आणि  त्यात उंची बघतात व जोडी पटली की मग त्या कोंबड्याचा मालक चाकू बांधणाऱ्याकडे नेतो पण एकच माणसाकडे नेत नसतात आणि चाकू वाल्यानी कोंबड्याचा पायाला चाकू बांधतो.

रणांगणाचा मैदानात आणतो. कोंबडे सोडण्याचा  मैदानाचा चारी बाजूंनी लोक उभा होऊन काला-काला, सपेद-सपेद, बुडदी-बूडदी असा प्रकारे कोंबड्यांचा रंगांचा स्वरूपाने ओरडतात. पैसांची होळ (पैज) लावत असतात .( त्यामध्ये कधी-कधी पैसे होळ लावणाऱ्यांचे भांडण होत असतात.)दोनही विरूद्ध कोंबडा आणले की मग लगेच सोडतात आणि त्या दोन कोंबड्यांची मारामारी सुरू होते, त्यामध्ये जो कोंबडा आधी मरेल तो हारेल आणि जो मरणार नाही तो विजय होईल. मग ज्याचा कोंबडा जिंकला असेल त्यानी चाकू जो बांधला असेल त्याला १०० किंवा २०० रूपये देत असतो आणि कोंबड्याना घरी घेऊन जातं व हारलेल्या कोंबड्याला खातात (पराजय झालेला).
स्वतःचा कोंबड्यास जखम झाला असेल तर त्याची जखमेवर इलाज करतात आणि त्या कोंबड्याला जर का जास्त जखम लागला असेल तर जास्तीत-जास्त दोन आठवड्या पर्यंत त्या कोंबड्यास बाजारात नेत नसतात. पण जर का कोंबडा हारला तर घरच्यांना वाईट वाटत असते किंवा कधी-कधी घरच्या बायका स्वतःचा पतीला रागवत असतात. ज्या दिवशी कोंबडा जिंकतो त्या दिवशी बायका त्याच्याशी गोड - गोड बोलतात.

- गणेश नरोटे

No comments:

Post a Comment